2023- 24 पासून पिकाचे नुकसान झाल्यास 100 टक्के पिक विमा मंजूर होणार, शासनाचा आदेश crop insurance 100% Manjur Honar

100 % compesation from crop insurance companies against crop damage in any stages : नमस्कार, केंद्र सरकारने खरीप पिक विमा योजनेचे आता निकष बदलून, जर कोणत्याही पिकाचे कोणत्याही टप्प्यावर जर नुकसान झाल्यास आता 100 टक्के नुकसान झाल्यास नुकसान देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहे. या निर्णयामुळे पिक विमा कंपन्यांची धांदड उडाली आहे.

या शासनाच्या निर्णयाविरोधात कंपन्यांनी कृषी मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. शासनाने या निर्णयाचा योग्य विचार करावा आणि या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा असे विमा कंपन्यांकडून कृषी मंत्राला कळवले आहे.

2023- 24 पासून खरीप हंगामासाठी बदल केले आहेत. लागवड नंतर एक महिन्यात जर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नुकसान झाले तर फक्त 25% उत्पादन खर्च धरून ही मदत मिळत होती. पण आता निकषांमध्ये बदल केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता ही रक्कम 100 टक्के शेतकऱ्याला मिळणार आहे.

सुरुवातीला म्हणजे याआधी केंद्र सरकार हे विमा कंपन्यांसोबत फक्त एकच वर्षाचा करार करत होते. त्यामुळे कंपन्यांकडून मिळणाऱ्या विमा संदर्भात पाठपुरवठा मध्ये हा वेळ निघून जात होता. पण आता सरकारने कमीत कमी तीन वर्षाचा करार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जर शेतमालाचे खरीप 202324 पासून नुकसान झाल्यास तर विमा कंपन्यांना ही रक्कम शंभर टक्के द्यायला सरकार भाग पाडणार आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.

aapla Baliraja

Leave a Comment